राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२, तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची अनुमती !

मुंबई – राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत, तर अन्य दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास राज्यशासनाने अनुमती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.