|

नवी देहली – केंद्रीय आणि रस्ते महामार्ग मंत्रालयाने एक योजना घोषित केली आहे. यानुसार रस्त्यांवरील अपघातात गंभीररित्या घायाळ झालेल्यांना एका घंट्याच्या आत रुग्णालयात पोचवणार्या व्यक्तीला ५ सहस्र रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना १५ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असणार आहे. ‘आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यांवरील अपघातग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे’, असे या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यात व्यक्तीला रोख पुरस्कारासमवेत एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वांत प्रामाणिकपणे सहकार्य करणार्या १० जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मोदी सरकार ने सड़क दुर्घटना में घायल लोगों की जान बचाने के लिए एक बड़ी पहल की है. @narendramodi #ModiGovernment #PMModi #Accident https://t.co/WfY15Trve2
— Zee News (@ZeeNews) October 5, 2021
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !