वर्ष २०१९ मध्ये योजनापूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्यात आला ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील

मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. वर्ष २०१९ मध्ये शिवसेना-भाजपमध्येही काहींनी जाणीवपूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण केला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.