आसाममध्ये सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणार्‍या १४ जणांना अटक

गौहत्ती (आसाम) – तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘समाजात तेढ निर्माण होईल, अशी माहिती सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्‍यांवर आसाम पोलिसांचे बारीक लक्ष आहे’, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. (अशांना शिक्षा म्हणून अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक)