सांगली जिल्ह्यात पूर आणि अतीवृष्टीमुळे ७४ रस्त्यांवरील वाहतूक बंद !


सांगली, २४ जुलै – जिल्ह्यात पडत असलेला पाऊस, पुर आणि इतर कारणे यांमुळे आतापर्यंत शिराळा, मिरज, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यांमधील एकूण ७४ रस्त्यांवरील वाहतूक खंडीत, तसेच बंद पडलेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सेवा बंद केली आहे.