
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या संदर्भात गेल्या दीड वर्षातील अनुभवानुसार एक गोष्ट लक्षात आली आहे की, अधिकाधिक लसीकरण करणे, हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
असोसिएशनने पुढे म्हटले की, पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे; पण यांसाठी काही मासांची वाट पहाणे अधिक चांगले ठरेल. सध्या देशात काही पर्यटनस्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होतांना दिसून आले आहे. हे जर असेच चालू राहिले, तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. वेगाने कोरोना विरोधी लसीकरण आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण