
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या संदर्भात गेल्या दीड वर्षातील अनुभवानुसार एक गोष्ट लक्षात आली आहे की, अधिकाधिक लसीकरण करणे, हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
असोसिएशनने पुढे म्हटले की, पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे; पण यांसाठी काही मासांची वाट पहाणे अधिक चांगले ठरेल. सध्या देशात काही पर्यटनस्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होतांना दिसून आले आहे. हे जर असेच चालू राहिले, तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. वेगाने कोरोना विरोधी लसीकरण आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !