राज्य सरकार बलात्कार्‍यांना राजाश्रय देत आहे ! – सौ. चित्रा वाघ, महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष, भाजप

सौ. चित्रा वाघ, महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई – राज्यात महिला, मुली यांच्यावरील बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पोलीसदलात काम करणार्‍या महिलांवरही बलात्कार होत आहेत. दुसरीकडे सरकार मात्र बलात्कार्‍यांना राजाश्रय देण्याचे काम करत आहे, अशी टीका भाजपच्या उपप्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केली आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर मंत्रीपदाचे त्यागपत्र दिलेले शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मंत्रीमंडळात पुन्हा घेण्यात येणार असल्याचे वक्तव्य उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यावर टीका करतांना सौ. चित्रा वाघ यांनी वरील वक्तव्य केले. निष्पाप मुलीच्या हत्येचे पाप डोक्यावर असणार्‍याला पुन्हा मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. हे वक्तव्य करणार्‍यांची पार्श्वभूमी पाहिली, तर अनेक गोष्टी पुढे येतील, असेही उदय सामंत यांचे नाव न घेता सौ. वाघ यांनी वक्तव्य केले.