युवकांनो, जीवनाच्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी गुणांचा अंगीकार करा !

मानवाचे गुण कालौघातही आपला ठसा उमटवत असणे !

कालाच्या अखंड महाओघात जी गोष्ट निर्विवादपणे तिचा अविस्मरणीय ठसा उमटवून गेली आहे, ती म्हणजे मानवी गुण ! विचारांचा प्रामाणिकपणा, त्यानुरूप आचार, सर्वांचे हित लक्षात घेऊन ठरवलेल्या ‘शिष्टाचारां’वर अटळ निष्ठा आणि स्खलनशील अशा नैसर्गिक प्रवृत्तीशी सतत झगडत रहाण्याची झुंजार वृत्ती हे मानवी गुण ज्या ठिकाणी एकत्र येतात, तेथे साकार होतो एक खराखुरा जिवंत माणूस ! त्याला असते स्वतःचे असे व्यक्तित्व आणि त्या व्यक्तित्वात असते परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य !

– श्री. रवींद्र परेतकर (संदर्भ : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी १९७७)