विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निराधार लोकांना अन्नधान्य संचाचे वाटप

सोलापूर, २३ मे (वार्ता.) – कोरोना संसर्गामुळे दळणवळणबंदी लागू करण्यात आल्याने येथील निराधार लोकांचे पुष्कळ हाल होत आहेत. या निराधार लोकांना येथील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अन्नधान्याच्या ५१ संचांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात शहरमंत्री श्री. दिलीप सुरवसे, जिल्हा सहसंयोजक श्री. रवि बोल्ली, श्री. अंबादास गोरंटला, गोरक्षक श्री. सिद्धु चरकुपल्ली, सहसंयोजक श्री. नागेश बंडी, श्री. श्रीनिवास गुंडेटी, डॉ. भालचंद्र आडकी, डॉ. आनंद गुंड्डू, तसेच सर्वश्री मनोहर नराल, अरुण नंदाल, प्रशांत पेंटर, रवि येदुर, रामभाऊ चक्राल यांनी सहभाग घेतला.