हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रशासनाला निवेदन
वाराणसी (उत्तरप्रदेश) – होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. दुर्दैवाने अलीकडे या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सामाजिक तणाव आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
‘काही नास्तिकतावाद्यांकडून कचर्याची होळी करा, होळीला नैवैद्य अर्पण करण्यापेक्षा तो गरिबांना दान करा’, असे अधार्मिक आणि श्रद्धेला हानी पोचवणारे उपक्रम चालवले जातात. यासमवेतच अमली पदार्थांचे सेवन करणे, रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणे, मद्यपान-धूम्रपान करणे आणि मद्याच्या मेजवान्या करणे यांवर प्रतिबंध करावा, तसेच अशा प्रकारे असामाजिक कृती करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रशासनाकडे अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी