आसाम आणि मध्यप्रदेश येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या

भाजपशासित राज्यांत त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, अपेक्षित नाही ! देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होण्यासाठी केंद्र आणि भाजपशासित राज्यांच्या सरकारांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

(प्रतिकात्मक चित्र)

गोहत्ती (आसाम) – मध्यप्रदेशमधील रीवा आणि आसामच्या तिनसुकिया येथे भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. रीवा येथे भाजपचे ग्राम संयोजक सुरेंद्र तिवारी यांची, तर तिनसुकिया जिल्ह्यातील पक्षाचे बूथ अध्यक्ष देवानंद गोगोई यांची हत्या करण्यात आली. गोगोई यांची त्यांच्या घराबाहेर पोटात धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी जयचंद्र गोगोई याला अटक करण्यात आली आहे. तो याच गावात रहाणारा आहे.

मध्यप्रदेशातील नौढिया गावामध्ये भाजपचे ग्राम संयोजक सुरेंद्र तिवारी यांची ६ हून अधिक गुंडांनी धारदार शस्त्राद्वारे आक्रमण करून हत्या केली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.