उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील नौजरपूर गावात मुलीची छेड काढणार्याच्या विरोधात तक्रार केल्याच्या अडीच वर्षांपूर्वीच्या वादातून मुलीच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमरिश शर्मा असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे. या घटनेची नोंद घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आहे. जुलै २००८ मध्ये शर्मा यांनी गौरव शर्मा याच्या विरोधात मुलीची छेड काढल्यावरून पोलिसांत तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. एक मासानंतर त्याला जामीन मिळाला होता.
#UttarPradesh Chief Minister #YogiAdityanath on Tuesday directed officials to invoke the National Security Act (NSA) against all the four accused involved in the murder of Amrish Sharma, a resident of Hathras.https://t.co/1mVGCgZ6Un
— IndSamachar News (@Indsamachar) March 2, 2021
गौरवची पत्नी आणि मावशी गावातील एका मंदिरात पूजेसाठी गेली होती. तेथे अमरिश शर्मा यांच्या दोन्ही मुली दिसल्यावर त्यांच्यात वाद झाला. याची माहिती मिळाल्यावर गौरव आणि अमरीश शर्मा तेथे पोचले. गौरव याने त्याच्या काही साथीदारांना दूरभाष करून तेथे बोलावून अमरिश शर्मा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी यांतील दोघांना अटक केली आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण