
शरजील उस्मानी याने हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
मुंबई – हिंदूंना कुणी शिव्या देत असेल, तर त्या ऐकून घेणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे सडेतोड प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही आघाडी केली आहे; परंतु अजूनही आम्ही कपाळावर टिळा लावतो. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शरजील प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार या संदर्भात काही पाऊल उचलत नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र त्यावर गुलाबराव पाटील यांनीही टीका केली.
राममंदिर उभारणीच्या नावाखाली जर कुणी खंडणी गोळा करत असेल, तर ते चुकीचे असून त्यावर कारवाई केली पाहिजे, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम