
नवी देहली – ‘हे दुसर्या सरकारने चालू केले होते’, हे सरकारचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले जाणार नाही. तुम्ही यातून तोडगा कसा काढत आहात ? कृषी कायद्यांची स्तुती करणारी एकही याचिका आमच्याकडे आलेली नाही. शेतकर्याच्या विषया संदर्भात न्यायालय तज्ञ नाही; मात्र तुम्ही या कायद्यांची कार्यवाही थांबवणार आहात कि आम्ही पावले उचलायची ? आम्ही समिती नेमू इच्छितो, तोपर्यंत सरकारने या कायद्यांच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी अन्यथा आम्हीच कायद्यांना स्थगिती देऊ, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दीड मासांपासून देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारला फटकारले.
‘परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोक थंडीत बसले आहेत. मरत आहेत. तिथे अन्नपाण्याचे काय आहे ? कोण व्यवस्था ठेवत आहे ?’, असे प्रश्नही न्यायालयाने या वेळी उपस्थित केले. शेतकर्यांना हटवण्यासंदर्भात, तसेच कायदे मागे घेण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
(सौजन्य : ABP NEWS HINDI)
‘ वाद सुटेपर्यंत कायदे लागू करणार नाही’, असे सरकार म्हणू शकले असते !
न्यायालयाने पुढे म्हटले की, आंदोलनाच्या ठिकाणी महिला आणि वृद्ध यांना का ठेवून घेतले जात आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. आम्ही तज्ञ नाही. आम्ही कायदे मागे घेण्याविषयी बोलत नाही आहोत. आम्ही इतकेच विचारत आहोत की, ही परिस्थिती कशी सांभाळणार आहात ? चर्चेतून हा तोडगा काढणार का ?, इतकाच आमचा प्रश्न आहे. ‘हा वाद सुटेपर्यंत कायदे लागू करणार नाही’, असे सरकार म्हणू शकले असते. सरकार समस्येचे समाधान आहे कि भाग ?, हे आम्हाला कळत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न