
कोल्हापूर – कोरोनाचा नवा विषाणूही सापडला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ते नियोजित कोल्हापूर दौर्यावर असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा केली जात आहे. महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याआधी जिल्ह्या जिल्ह्यातील महाविद्यालये आणि वसतीगृहे पुन्हा अलगीकरण कक्षासाठी देण्यात आली आहेत का?, याची माहिती घेतली जात आहे.

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?, याची दक्षता घेतली जात असल्यानेच महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्यात आलेली नाहीत. काही दिवसांत कोरोनाचे लसीकरण चालू होईल. लसीकरणाचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा होऊ द्या. त्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी बैठक घेऊन महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.’’
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !