भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

आपत्काळाच्या दृष्टीने कौटुंबिक स्तरावर करायची सिद्धता

कुटुंबासाठी आवश्यक ती वस्त्रे, वस्तू आदी समवेत ठेवा ! : यात कपडे, अंथरुणे-पांघरुणे, सुई-दोरा, पादत्राणे, साबण, दंतमंजन, छत्र्या, काड्यापेट्या, मेणबत्त्या, ‘बल्ब’, दाढीचे सामान, आध्यात्मिक उपायांसाठीची सात्त्विक उत्पादने (उदा. अत्तर, कापूर, उदबत्ती) आदींचा समावेश असावा.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)