१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण

१ अ. ‘विज्ञानवाद्यांनो, विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होण्याची कारणे समजून घ्या !
१. विज्ञानाचा उद्देश केवळ ‘भौतिक ज्ञानासाठी विज्ञान’ असा असल्याने ‘ईश्वरप्राप्तीसाठी विज्ञान’ हे विज्ञानात येत नाही.
२. विज्ञानामुळे पूर्वी मानवाला विविध गोष्टी करण्यासाठी लागणारा वेळ वाचला, उदा. स्वयंपाक करणे, प्रवास, एकमेकांना संपर्क करणे, शेती करणे, विविध उत्पादने तयार करणे इत्यादींसाठी मानवाला पूर्वी बराच वेळ लागायचा. आता फारच अल्प काळात या गोष्टी करता येतात. यांमुळे ‘त्या वाचलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा ?’, हे मात्र विज्ञानाने शिकवले नाही. कलियुगात मानवाची वृत्ती मुळातच तमप्रधान असल्यामुळे या रिकाम्या वेळेचा वापर मानव साधना, नीतीमत्ता इत्यादी शिकण्यासाठी न करता सुखप्राप्तीसाठी करत आहे. त्यामुळे तो मायेत अधिकाधिक अडकत आहे.
३. विज्ञानामुळे अहं वाढल्यामुळे दुसर्यावर स्वामित्व गाजवण्याचे विचार प्रबळ होत गेले. त्यामुळे दोन महायुद्धे झाली आणि तिसरे काही वर्षांतच होणार आहे.’ (१४.२.२०१४)
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

२ अ. वाईट शक्तींच्या ‘आसुरी कलेचा’, अविष्कार म्हणजे विज्ञानातील नवनवीन घातक शोध लागणे आणि कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होणे
काही वैज्ञानिकांमध्ये नवीन शोध लावण्याची क्षमता मुळातच असल्याने ते शोध लावतात. काही वैज्ञानिकांना मानवजातीला घातक असणारे काही शोध लावण्याच्या प्रक्रियेत वाईट शक्तींची साथ मिळते. चौथ्या पाताळात ‘येहू’ नावाची वाईट शक्ती आहे. तिला ‘आसुरी कलाशक्ती’ आत्मसात आहे. या आसुरी कलाशक्तीत ‘विज्ञानाशी निगडित असंख्य संकल्पना आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान’ आहे. असे सूक्ष्म ज्ञान ‘येहू’ ही वाईट शक्ती काही वैज्ञानिकांना देते. तेव्हा त्या वैज्ञानिकांना ‘वैज्ञानिक शोध लावण्याचे स्फुरण होत आहे’, अशी जाणीव होते. त्यानंतर वैज्ञानिक सुचलेली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध प्रयोग करतो. तेव्हा ‘येहू’ ही वाईट शक्ती सूक्ष्मातून त्या वैज्ञानिकांना शोधाविषयी सतत पुढील मार्गदर्शन करते. ‘वैज्ञानिकाने मानवजातीला घातक असलेला हा शोध अचूक आणि अल्प वेळेत लावावा’, यासाठी ‘येहू’ ही वाईट शक्ती स्वतःची सर्व शक्ती पणाला लावून त्या वैज्ञानिकांना साहाय्य करत असते. त्या वैज्ञानिकाने एक शोध लावला, तरीही तो मानवजातीला घातक असल्याने त्यातून कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होत असते. तेव्हा ‘येहू’ या वाईट शक्तीला सनातन धर्माची हानी केल्याविषयी समाधान वाटते.
२ आ. विज्ञानाद्वारे व्यक्तीचे मन आणि वातावरण अल्पावधीत दूषित होऊन व्यक्तीला साधना अन् धर्माचरण यांचा विसर पडणे
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (भ्रमणभाष, माहितीजाल, दूरदर्शनसंच इत्यादींचा) उपयोग करतांना त्यांद्वारे व्यक्तीचे मन आणि वातावरण यांवर तमोगुणाचा प्रभाव पडतो. त्यामुळे व्यक्तीवर काळ्या शक्तीचे आवरण येऊन तिचे मन, तसेच तिच्या भोवतीचे वातावरण अल्प कालावधीतच दूषित होते. अशा व्यक्तीला साधना आणि धर्माचरण यांचा विसर पडतो. अशी व्यक्ती दिशाहीन बनते, तसेच तिचे जीवन विज्ञानातील अधिकाधिक सुख उपभोगण्यात व्यर्थ जाते.
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वैश्विक अशांतीचे मूळ कारण शोधून त्यावर मार्गदर्शन करणे
सध्याच्या प्रतिकूल काळात ‘समाजाची अधोगती का होत आहे आणि त्यावर उपाय काय ?’, हे बहुतेकांना समजणे कठीण आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य असल्यामुळे त्यांनी ‘कलियुगाचा प्रभाव आणि वाईट शक्तींचे प्राबल्य यांमुळे समाज विज्ञानाच्या आहारी जात आहे’, हे अंतर्ज्ञानाने जाणले. ‘समाजाची अधोगती रोखावी आणि लोकांना चिरंतन आनंदाची प्राप्ती व्हावी’, तसेच ‘वैश्विक अशांती दूर व्हावी’, यांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सर्वांना ‘विज्ञानामुळे होणारी हानी आणि साधनेचे महत्त्व’, समजावून सांगत आहेत.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अंतर्ज्ञान आणि द्रष्टेपण !
विज्ञानामुळे व्यक्तीची अधिकाधिक सुख उपभोगण्याची वृत्ती बनली आहे. त्यामुळे व्यक्ती संकुचित, स्वार्थी आणि अहंयुक्त बनली आहे. व्यक्तीतील अहं वाढल्यामुळे तिचे ‘इतरांवर अधिकार गाजवणे, इतरांना न्यून लेखणे आणि त्यांना नामशेष करणे ’, असे वर्तन घडू लागले आहे. परिणामी विविध राष्ट्रांमधील ‘संघर्ष, स्पर्धा आणि अशांती’ ही वाढली आहे. ही परिस्थिती तिसर्या महायुद्धाला पूरक आहे. या महायुद्धामुळे पृथ्वीवर भयंकर विनाश होणार आहे. हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अंतर्ज्ञानाने जाणले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी लिखाणाद्वारे ‘विज्ञानामुळे होणारी हानी आणि साधनेची अपरिहार्यता’, समाजाला समजावून सांगितली आहे. यात त्यांचे द्रष्टेपणही आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २६.५.२०२६, वेळ : सकाळी ११.३०, कालावधी : ३० सेकंद)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे