सातारा, २४ मार्च (वार्ता.) – कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट असून त्याचा संसर्ग थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापन आणि कारखाने यांनी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच या काळातील वेतनही त्यांना द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या काळात आस्थापने आणि कारखाने यांचे मालक कामगारांना विनावेतन सुटीवर पाठवू शकतात. तसेच त्यांना कामावरून अल्प करू शकतात. अशा संकटसमयी सर्वांनीच संघटितपणे तोंड देणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगार जरी कामावर नसले, तरी त्यांची पगारी सुटी धरून त्यांना किमान वेतन द्यावे. असे न केल्यास सामाजिक संतुलन बिघडून कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. तेव्हा कामगारांना वेतन देऊन आस्थापनांचे मालक, दुकानदार, कारखानदार आदींनी सामाजिक योगदान द्यावे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव