ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
हिंगोली – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. याविषयीचा निर्णय २३ मार्च या दिवशी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. नांदापूर गावाची लोकसंख्या २ सहस्र ७०० आहे. गावातून बाहेरगावी जाणार्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच गावात प्रवेश करतांना साबणाने हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !