ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
हिंगोली – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. याविषयीचा निर्णय २३ मार्च या दिवशी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. नांदापूर गावाची लोकसंख्या २ सहस्र ७०० आहे. गावातून बाहेरगावी जाणार्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच गावात प्रवेश करतांना साबणाने हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !