२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘वर्ष २००१ मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी माझा मुक्काम बेळगाव (कर्नाटक) येथे होता. ‘श्रीरामनवमीच्या दिवशी बेळगावच्या प्रसिद्ध प.पू. काणे महाराज यांच्या मठात प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आहे’, असे मला समजले. त्याप्रमाणे मी सकाळी ९ वाजता प.पू. काणे महाराज यांच्या मठात गेलो.

श्री. अरुण डोंगरे

मार्गदर्शनाला पुष्कळ लोक उपस्थित होते. त्या गर्दीत मी मागे बसलो होतो. तेव्हा एक गृहस्थ आले आणि त्यांनी मला एका ओळीत सर्वांत पुढे बसवले. तेथून जवळच असलेले प.पू. डॉक्टर मला स्पष्टपणे दिसत होते. थोड्याच वेळात त्यांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन चालू झाले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला वाटले, ‘श्रीराम स्वतः बोलत आहे आणि तेही स्वतःविषयी !’ त्या ४५ मिनिटांच्या मार्गदर्शनाच्या वेळी माझे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्या वेळी मला सभोवतालचे भान नव्हते. ‘भावजागृती म्हणजे काय असते ?’, हे मला त्या दिवशी प्रथमच कळले. या अनुभूतीबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अरुण डोंगरे (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक