‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकेला आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या ४ – ५ दिवस आधी वातावरणात चैतन्यमय आणि आनंदमय स्पंदने जाणवणे
‘यज्ञस्थळी गेल्यानंतर आम्ही वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आलो आहोत’, असे मला जाणवत होते. या महायज्ञाच्या ४ – ५ दिवस आधीपासूनच मला वातावरणात पुष्कळ पालट जाणवत होता. ‘सकारात्मक, चैतन्यमय आणि आनंदमय स्पंदने पृथ्वीवर येत आहेत’, असे मला जाणवत होते.
२.‘श्री राजमातंगी महायज्ञा’ची व्यापकता ब्रह्मांडापर्यंत आहे’, असे जाणवणे
‘हा महायज्ञ पृथ्वीवर होत नसून देवलोकात होत आहे’, असे मला जाणवत होते. यज्ञ चालू असतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘यज्ञस्थळ ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे. वेदमूर्ती करत असलेले मंत्रोच्चार अंतराळापर्यंत जात आहेत. त्यांची व्यापकता ब्रह्मांडापर्यंत आहे’, असे मला जाणवत होते.’
– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना आणि त्या सेवाकेंद्रातून निघत असतांना साधिकेने अनुभवलेले दैवी क्षण !
१७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या मुंबई येथे आल्या होत्या. ‘१८.५.२०२६ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना ‘श्री सरस्वतीमातेने विणेची तार छेडावी, त्याप्रमाणे मंजुळ ध्वनी आसमंतात जात आहे’, असे मला जाणवले.

२. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बोलत असतांना त्यांचे शब्द ब्रह्मांडातील पोकळीत जात असून तेथील जिवांनाही हे मार्गदर्शन ऐकू येत आहे’, असे जाणवणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बोलत असतांना त्यांच्या शब्दांमध्ये शिवाच्या डमरूतील नादशक्ती अनुभवता येत होती. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे शब्द ब्रह्मांडातील पोकळीत जात आहेत आणि तेथील जिवांनाही हे मार्गदर्शन ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.

३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सेवाकेंद्रातून निघत असतांना कोकिळा मधुर स्वरात गुंजन करत असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सेवाकेंद्रातून निघत असतांना त्या सेवाकेंद्राच्या बाहेर उभ्या राहून १० मिनिटे साधकांशी बोलत होत्या. तेव्हा जवळच्या झाडावर २ कोकिळा अत्यंत मधुर स्वरात कूजन करत होत्या. त्या कोकिळा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आल्या आहेत’, असे एकमेकींना सांगत आहेत’, असे मला जाणवले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ बोलत असतांना मला एक वेगळाच आनंद जाणवला आणि शांती अनुभवता आली.’
– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)
‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या सिद्धतेसाठी उभारलेल्या सेवाकेंद्रात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

श्री राजमातंगी महायज्ञाच्या कालावधीत भोजन व्यवस्थेच्या संबंधित सेवा करतांना ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत आहे’, असे जाणवणे : ‘१७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या कालावधीत माझ्याकडे भोजन व्यवस्थेच्या संबंधित सेवा होती. १६ आणि १७.५.२०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या सिद्धतेसाठी उभारलेल्या सेवाकेंद्रात भोजनसेवा करायची आहे’, असे मला समजले. काही अडचणींमुळे तेथे संतांचे छायाचित्र किंवा देवतेचे चित्र लावता येणार नव्हते. आम्ही सेवाकेंद्रात गेल्यावर ‘समोरच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे फेटा घातलेले मोठे छायाचित्र आणि त्याच्या शेजारी श्री राजमातंगीदेवीचे चित्र ठेवले आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. देवी जणू मला म्हणत होती, ‘मी इथे आले आहे.’ तेथील सेवाकेंद्रात सेवा करतांना ‘आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत आहोत’, असे मला जाणवले.’
– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
भारतीय वाद्यांचा नाद ऐकल्यावर त्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
देशातील मंदिरांसाठी एका स्वतंत्र ‘सनातन संरक्षण बोर्ड’ किंवा समिती यांची स्थापना केली जावी ! – Shankaracharya Sadanand Saraswati
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !