भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi

भारताला ‘हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका’ असे म्हणणार्‍या सिद्धरामय्या यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रत्युत्तर

डावीकडून सिद्धरामय्या आणि प्रल्हाद जोशी

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ जून या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. याला प्रत्युत्तर देतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘काहीही झाले, तरी भारत हिंदु राष्ट्रच आहे’, असे म्हटले आहे.

सिद्धरामय्या यांनी म्हटले होते की, राज्यघटना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. (राज्यघटनेचे तीन तेरा काँग्रेसवाल्यांनीच वाजवले आहेत आणि तेच राज्यघटना वाचवण्याची बोंब ठोकत असतात ! – संपादक) बहुविधता जपली पाहिजे आणि त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. (बहुविधतेच्या नावाखाली हिंदूंवरील अन्याय आता हिंदू सहन करणार नाहीत. त्यामुळेच काँग्रेस संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे ! – संपादक)

जोशी म्हणाले की, सिद्धरामय्या यांना ठाऊक आहे की, येथे हिंदूंची लोकसंख्या अधिक असल्यामुळेच लोकशाही अस्तित्वात आहे. (ही लोकशाही धर्मनिरपेक्ष असल्याने आज भारतात हिंदु असुरक्षित आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांकडे पहा, तिथे लोकशाहीच नाही.