Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !

मध्यप्रदेशात अटक केलेल्या आतंकवादी गटाने चौकशीत दिली माहिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यात आतंकवादी जाळे उघड झाल्यानंतर यात अटक करण्यात आलेल्या इझहार उल हक याने सांगितले की, सर्व आतंकवादी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांसारख्या माध्यमांद्वारे पाकिस्तानमधील प्रमुखांच्या संपर्कात होते. देशभरात जाळे उभारणे आणि मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद  करून त्यांना ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) म्हणून सिद्ध करणे हा त्यांचा उद्देश होता. ते ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’साठी काम करत होते. वेळ आल्यावर सर्व आतंकवादी एकाच वेळी बाहेर येतील आणि सत्ता उलथवून टाकतील. टारगेट किलिंग (लक्ष्य करून हत्या करणे) आणि देशात भीतीचे वातावरण निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

आतंकवादविरोधी पथकाच्या मते, या संघटनेचा उद्देश वर्ष २०४७ पर्यंत देशात इस्लामी कायदा लागू करणे हा आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांचा उद्देश ‘भारताला इस्लामी देश करणे’ हा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्यासाठी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !