आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh

भाग्यनगर (तेलंगाणा) – पाकिस्तान आतंकवादाला प्रोत्साहन देत असून आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भाग्यनगरमध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने जगाला दाखवून दिले आहे की, शांतता आणि सलोखा यांची भाषा न समजणार्‍यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे ?, हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘सिंधु पाणी करार’ रहित करून भारताने ‘माणुसकी आणि करुणा गमावलेल्यांनी भारताकडून पाण्याची अपेक्षा करू नये. जे आतंकवादाला आश्रय देतात आणि मानवतेचे शत्रू आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही सिंधु नदीचे पाणी पोचू देणार नाही’, असा स्पष्ट संदेश दिला आहे.’’

पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, असे विधान केले होते.

संपादकीय भूमिका

आता भारताने आतंकवाद्यांसह त्यांच्या पाठीराख्यांच्या तोंडचे पाणी पळेल, अशी धडक कारवाई करणे अपेक्षित !