
१. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले घरी वास्तव्यास आल्यावर त्या कठीण प्रसंगांची तीव्रता हळूहळू अल्प होत जाणे
‘वर्ष १९९९ ते २००३ या कालावधीत आमच्यावर कठीण प्रसंग ओढवला होता. त्या कालावधीत आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागत होता. त्यामुळे आमचा देवावरचा विश्वास ढळू लागला होता. तेव्हा अकस्मात् आमच्या गावात सनातनचा सत्संग चालू झाला. तेव्हा आम्हाला येत असलेल्या अडचणींविषयी आई सत्संगात सांगायची. नंतर आई आणि माझी बहीण नियमितपणे सत्संगात जाऊ लागल्या. वर्ष २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागेची आवश्यकता होती. त्या वेळी आई-बाबा (सौ. पूनम प्रभुदेसाई आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई, दोघांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ओळखतही नव्हते. तेव्हा आई-बाबांनी कुठलाही विचार न करता गुरुचरणी घर अर्पण केले. प.पू. डॉक्टर आमच्या घरी वास्तव्याला आले. त्यानंतर काही कालावधीने हळूहळू आम्हाला होत असलेल्या त्रासाची तीव्रता न्यून होत गेली.
२. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे त्या कालावधीत प.पू. रामानंद महाराज, प.पू. जोशीबाबा यांचा आणि अनेक संतांचा चरणस्पर्श घराला झाला.

३. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे लाभलेले जीवनदान !
त्या वेळी प.पू. डॉक्टर आमच्या जीवनात आले नसते, तर कदाचित् आम्ही कुणीच जिवंत राहिलो नसतो. त्या वेळी ‘आमचे जीवन संपले आहे’, असेच आम्हाला वाटत होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला जीवनदान लाभले.
प.पू. डॉक्टरांचे आमच्यावरील हे ऋण कधीही न फिटणारेच आहे. प.पू. डॉक्टर म्हार्दाेळ येथील आमच्या घरी राहिले होते. या गोष्टीला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते म्हार्दोळचे घर प्रभुदेसाईंचे घर नाही, तर ते घर प.पू. डॉक्टरांचा आश्रम होता, आहे आणि या पुढेही गुरूंच्या कृपेने असणारच आहे.
आम्ही प्रभुदेसाई कुटुंबीय प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्री. गिरिजय परशुराम प्रभुदेसाई, म्हार्दोळ, गोवा. (१४.४.२०२६)
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !