Kolkata Violence : कोलकात्यात रस्त्यावर नमाजपठणासाठी मुसलमानांकडून हिंसक आंदोलन : ३ पोलीस घायाळ !

  • २५० मुसलमानांच्या जमावाने पोलिसांवर केली दगडफेक

  • पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजप सरकारने रस्त्यावर नमाजपठण करण्यास बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ येथील पार्क स्ट्रीट परिसरात मुसलमानांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी ते हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

१७ मे या दिवशी प्रशासनाकडून परिसरात अवैध बांधकामावर बुलडोझर कारवाई केली जात होती. याच वेळी रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून वाद चालू झाला. २५० पेक्षा अधिक मुसलमान आंदोलकांनी कारवाईला विरोध केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी रस्ता रोखून धरला आणि निषेध व्यक्त करत लोकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी पोलीस आणि मुसलमान यांच्यात धक्काबुक्कीही झाली. बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांनी परिसराला वेढा घातला. अतिरिक्त सुरक्षा दल पाचारण करण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसक चकमकीत ३ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.

कायदाद्रोही मुसलमानांना पाठीशी घालणारा माकप !

माकपचे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे) नेते महंमद सलीम म्हणाले की, सरकारचा निर्णय असा नसावा की, जनता रस्त्यावर येईल. (रस्त्यावर नमाजपठण करणे हा सरकारचा निर्णय आहे, असे सलीम यांना म्हणायचे आहे का ? – संपादक) लोकांनी निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लोक पालटाची मागणी करत आहेत. परिस्थिती अधिक बिघडावी यासाठी हे झालेले नाही. सरकारने आता परिस्थिती सुधारायला हवी. लोकांनी शांतता आणि सुव्यवस्था यांसाठी मतदान केले आहे. जर हे तोडले गेले, तर लोक रस्त्यावर येणारच. (कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हिंदूंनी मतदान केले आहे आणि त्यानुसारच बंगालमधील भाजप सरकार काम करत आहे. जे कुणी याच्या विरोधात रस्त्यावर येणार असतील, तर यांचा योग्य बंदोबस्त केला जाणारच, हेच या घटनेतून लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये पोलिसांना अशा प्रकारच्या संघर्षाला अनेक ठिकाणी सामोरे जावे लागणार आहे. कारण अनेक वर्षांची ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी काही वेळ लागणारच आहे.