
बीरभूम (बंगाल) – बंगालमध्ये भाजप सत्तेत येताच बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे असलेल्या ‘श्री श्री राधा गोविंद मंदिरा’च्या भोगघरावरील तृणमूल काँग्रेसचे नियंत्रण हटवण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक लोक यांच्या साहाय्याने तेथे चालणारे तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यालय बंद करण्यात आले असून ती जागा पुन्हा मंदिर समितीच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

या मंदिराची स्थापना वर्ष १९९० मध्ये परिसरातील लोकांनी वर्गणी जमा करून केली होती. हे मंदिर दीर्घकाळापासून भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यानंतर मंदिराशेजारी भोगघराचे बांधकाम चालू करण्यात आले होते. तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी बांधकामाचे काम थांबवून त्या जागेवर नियंत्रण मिळवले आणि तिथे पक्षाचे कार्यालय चालू केले होते.
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !