(म्हणे) ‘भारतातील २५ कोटी मुसलमानांनी एकत्र येऊन भारताचे तुकडे करावेत !’ – Bangladesh BNP Leader

बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाचे नेते अल्ताब हुसेन मुल्ला यांचे चिथावणीखोर विधान !  

अल्ताब हुसेन मुल्ला

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणात आता तेथील नेत्यांकडून भारताविरुद्ध उघडपणे विष ओकले जात आहे. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (‘बी.एन्.पी.’चे) नेते अल्ताब हुसेन मुल्ला यांचा एक अत्यंत प्रक्षोभक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यामध्ये त्यांनी भारतीय मुसलमानांना देशाचे तुकडे करण्यासाठी चिथावणी दिली आहे.

एका सभेला संबोधित करतांना ‘जर भारतातील २० ते २५ कोटी मुसलमान एकत्र आले, तर ते भारताचे तुकडे-तुकडे करू शकतात आणि ते लवकरच हा मार्ग स्वीकारतील’ असे विधान त्यांनी केले आहे.

भारतात तीव्र संताप

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. अनेक संरक्षणतज्ञ आणि राजकीय विश्लेषक यांनी याला भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेली थेट धमकी म्हटले आहे. अनेकांनी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे मागणी केली आहे की, बांगलादेशाच्या सरकारकडे या प्रकरणाचा कडक शब्दांत निषेध नोंदवला जावा.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील नव्याने सत्तेवर आलेले बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे सरकार एकीकडे भारताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची भारतद्वेषी जिहादी मानसिकता दाखवून देत आहे. यातून बांगलादेशावर विश्वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट आहे !
  • भारत इराण युद्धामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशाला डिझेल देऊन साहाय्य करत आहे, भारतीय आस्थापने त्याला वीजपुरवठा करत आहेत, भारतातूनच गंगानदीचे पाणी बांगलादेशाला जाते, हे पहाता भारताने बांगलादेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आताच पावले उचलणे आवश्यक आहे !