Pahalgam Attack Anniversary : भारत कधीही आक्रमण विसरत नाही ! – भारतीय सैन्य

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथील आतंकवादी आक्रमणाला एक वर्ष झाल्यावर भारतीय सैन्याची पोस्ट

नवी देहली – जेव्हा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तर हे निर्णायक असते. भारत कधीही आक्रमण विसरत नाही. ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला, त्यांना न्याय देण्यात आला आहे. भारत एकसंध आहे, अशी पोस्ट भारतीय सैन्याकडून ‘एक्स’वर करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी हिंदूंना जिहादी आतंकवाद्यांनी धर्म विचारून ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने सैन्याने ही पोस्ट केली. भारतीय सैन्याने या घटनेचा सूड उगवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकमधील जिहादी आतंकवाद्यांची ९ ठिकाणी नष्ट केली होती, तसेच पाकचे वायूदल आणि सैन्यदल यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.