Terror Network Exposed : देशभरात बाँबस्फोटांची मालिका घडवण्याचा कट रचणार्‍या ४ जणांना अटक !

  • देशातील प्रतिष्ठित संस्था, गर्दीची ठिकाणे, वाहने आणि रेल्वे स्थानके यांना उडवण्याचा होता कट

  • पाकिस्तानहून मिळत होत्या सूचना !

अटक करण्यात आलेले आतंकवादी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २ एप्रिलला येथे कारवाई करत ४ आतंकवाद्यांना अटक केली. याचा खुलासा ३ एप्रिलला करण्यात आला. हे आतंकवादी उत्तरप्रदेशातील रहिवासी असून त्यांना पाकिस्तानमधून आतंकवादी आक्रमण करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. या आतंकवाद्यांनी भारतात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडवल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. ‘टेलिग्राम’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘सिग्नल’ यांसारख्या सुरक्षित समजल्या जाणार्‍या सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानातील आतंकवादी यांच्या संपर्कात होते. देशातील प्रतिष्ठित संस्था, रेल्वे स्थानके आणि गाड्या यांमध्ये स्फोट घडवण्याच्या हे चौघे सिद्धतेत होते. त्यांची ओळख साकिब उपाख्य ‘डेव्हिल’, अरबाब, विकास गहलावत उपाख्य रौनक आणि लोकेश उपाख्य बाबू उपाख्य पपला पंडित अशी झाली आहे.

चौकशीतून समोर आले महत्त्वपूर्ण खुलासे !

१. आतंकवाद्यांकडून रसायनाने भरलेला कॅन, ७ मोबाईल, २४ भित्तीपत्रके आणि आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत. २ एप्रिलला त्यांचा लक्ष्मणपुरीचे रेल्वे स्थानक उडवण्याचा कट होता. तथापि पोलिसांना त्यांची माहिती वेळीच मिळून त्यांनी कारवाई केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

२. साकिब या टोळीचा प्रमुख होता. तो मूळचा राज्यातील मेरठ जिल्ह्यात असलेल्या अगवानपूर गावाचा रहिवासी आहे. तो केस कापण्याचे काम करतो. सामाजिक माध्यमांतून तो पाकिस्तानमधील ‘हँडलर्स’च्या (आतंकवादी समन्वयकांच्या) संपर्कात आला.

३. टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि सिग्नल या माध्यमांतून तो पाकिस्तानातील जाळे, कट्टरपंथी गट आणि अफगाणिस्तानमधील काही संशयास्पद क्रमांक यांच्याशी जोडला गेला. साकिबने त्याच्याच गावातील अरबाबला या यंत्रणेत सहभागी केले. यानंतर त्याने गौतमबुद्ध नगर येथील विकास गहलावत उपाख्य रौनक आणि लोकेश यांनाही टोळीत जोडले.

४. हे सर्व आरोपी पैशांच्या लालसेपोटी आणि कट्टरपंथी प्रभावाखाली येऊन या कटाचा भाग बनले. ते वेगवेगळ्या ठिकाणी रेकी (पहाणी) आणि इतर कारवाया करत होते.

५. या टोळीचा मुख्य उद्देश भारतात भीती आणि अस्थिरता यांचे वातावरण निर्माण करणे हा होता. त्यांनी गाझियाबाद, अलीगड आणि लक्ष्मणपुरी यांसारख्या शहरांमधील अनेक ठिकाणांची रेकी केली होती.

६. टोळीचे सदस्य छोट्या-छोट्या जाळपोळीच्या घटना घडवून त्याचे व्हिडिओ बनवून पाकमधील आतंकवाद्यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन करत होते. यातून त्यांना पैसे पाठवले जात.

७. चौघांना भडकावण्यासाठी त्यांना धर्माच्या नावावर हिंसा आणि जाळपोळ करण्यासाठी प्रेरित केले जात होते.

संपादकीय भूमिका

  • भारतीय गुप्तचरांनी पाकिस्तानमध्ये घडवलेला विक्रम दाखवणार्‍या ‘धुरंदर : द रिव्हेंज’ हा ‘प्रोपेगेंडा’ (कुप्रचार) चित्रपट असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडणार्‍यांना आता या घटनेवरून हिंदु जनतेने जाब विचारला पाहिजे !
  • भारताला पुन्हा आतंकवादी आक्रमणांच्या आगीत ढकलू पहाणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा करून त्यांच्या मृतदेहांना अग्नी दिला पाहिजे आणि त्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केले पाहिजेत. इस्लाममध्ये अग्नी देणे हराम (निषिद्ध) असून ते लोक नरकाला प्राप्त होतात, अशी शिकवण असल्याने यातून कुणी भारतात आतंकवाद पसरवण्याआधी दहा वेळा विचार करेल !