
१. ‘श्रीमती राणेकाकू स्वभावाने शांत आहेत.
२. प्रेमभाव
एकदा कै. शशिकांत राणेकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि काकू आमच्या घरी आले होते. तेव्हा माझी पत्नी रुग्णाईत होती. हे त्यांना समजल्यावर राणेकाका आणि काकू लगेच रुग्णालयात जाऊन पत्नीला भेटल्या. काकूंनी माझ्या पत्नीला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञाची विभूती दिली. ही विभूती त्यांनी भक्तीभावाने दिली. त्यातून ‘त्यांनी पत्नीला गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद दिला’, असे मला वाटले.

३. सेवेची तळमळ
काकूंची सेवा करण्याची पुष्कळ तळमळ असते. त्या प्रत्येक सेवा मनापासून करतात.
४. त्यागी वृत्ती
राणेकाका आणि काकू यांचा त्याग पुष्कळ आहे. त्यांनी स्वतःचे ठाण्यातील घर आश्रमासाठी वापरण्यास दिले. त्यानंतर ते दोघे पती-पत्नी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहू लागले. दोघेही अधिकोषात उच्च पदावर असूनही काकू आश्रमात मिळेल ती सेवा करत होत्या.
५. श्रीमती राणेकाकूंमध्ये जाणवलेले पालट
अ. वर्ष २०२५ मध्ये मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा मला त्यांच्या चेहर्यात पालट दिसला.
आ. मला त्यांच्या बोलण्यात सकारात्मकता जाणवली.
‘काकूंची आध्यात्मिक प्रगती झाली असेल’, असे मला वाटले.
‘राणेकाकूंची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. नंदकिशोर ठाकूर (वय ६७ वर्षे), ठाणे (२५.२.२०२६)
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !