
ढाका (बांगलादेश) – महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बिघडलेले भारत आणि बांगलादेश यांचे द्वीपक्षीय संबंध पुन्हा सुरळीत होण्याचा प्रयत्न केला जात आहे. बांगलादेशातील नवनिर्वाचित तारिक रहमान सरकारचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात येणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतातील बांगलादेशाचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. डॉ. जयशंकर यांनी सामाजिक माध्यमांवर ‘ही भेट परस्पर संबंध पुढे नेण्यावर केंद्रित होती’, असे म्हटले.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin