इराणविषयी इतकेच प्रेम असेल, तर तिथे जाऊन त्याला पाठिंबा द्या ! – Sambhal DSP Kuldeep Kumar

संभल (उत्तरप्रदेश) येथील पोलीस उपअधीक्षक कुलदीप कुमार यांची इराण समर्थक  मुसलमानांना चेतावणी !

संभलचे विभागीय पोलीस उपअधीक्षक कुलदीप कुमार इराण समर्थक मुसलमानांना चेतावणी देतांना

संभल (उत्तरप्रदेश) – जगातील २ देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि भारतात काहींना विनाकारण खाज सुटली आहे. जर कुणाला दुसर्‍या देशाविषयी इतकेच प्रेम असेल, तर त्यांनी विमानाने तेथे जावे आणि तिथे जाऊन त्याला पाठिंबा द्यावा. भारतात आंतरराष्ट्रीय सूत्रांवरून गदारोळ आणि घोषणाबाजी सहन केली जाणार नाही. मशिदींच्या बाहेर नमाजपठण करण्यास अनुमती दिली जाणार नाही. कुणी रस्त्यावर नमाजपठण करतांना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी संभलचे विभागीय पोलीस अधिकारी कुलदीप कुमार यांनी नुकतीच ईद आणि शुक्रवारचे नमाजपठण यांपूर्वी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक मुसलमानांना दिली होती.

(म्हणे) ‘हा देश कुणाच्या बापाचा नाही !’ – खासदार ओवैसी यांची टीका

कुलदीप कुमार यांच्या विधानावरून खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. एका सभेत ते म्हणाले की, आम्हाला कुठे जायचे हे कुणी सांगण्यासाठी हा देश कुणाच्या बापाचा नाही. देश राज्यघटनेद्वारे चालणार कि कुणाच्या बोलण्याने ? (‘देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान तत्कालीन काँग्रेस सरकारचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केल्यावर ओवैसी यांनी यावर टीका करत अशा प्रकारचे विधान का केले नव्हते ? ‘भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन हिंदूंना भारत आणि मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले होते. त्यामुळे आताही कुणी ‘मुसलमानांना पाकिस्तान दिल्याने त्यांनी तेथे जायला हवे’, असे म्हणत असेल, तर ते चुकीचे ठरत नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असले, तर देशात उद्दाम धर्मांध आणि भारतद्वेष्टे यांच्यावर नक्कीच जरब बसून देशात कायदा आणि सुव्यवस्था नांदेल, हे निश्चित !