Himanta Biswa Sarma : प्रत्येक इंच भूमी अतिक्रमणातून मुक्त करू !

  • आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

  • हैलाकांडी जिल्ह्यातील ९१२ एकर भूमी अतिक्रमणमुक्त

हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, हैलाकांडी जिल्ह्यातील ९१२ एकरांहून अधिक भूमी अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे. राज्यातील एका इंच भूमीवरही बेकायदेशीर नियंत्रण सहन केले जाणार नाही. ‘अनेक वर्षांपासून बळकावलेली वनभूमी आणि शासकीय भूमी पूर्णपणे रिकामी करून घेण्यात आली’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशी कारवाई चालूच रहाणार !

वर्ष २०२१ पासून आतापर्यंत आसाममध्य सहस्रो एकर भूमी अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे. सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी अशी कारवाई पुढेही चालू राहील, असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते बेकायदेशीर अतिक्रमणामुळे राज्यातील लोकसंख्येचे संतुलन बिघडत होते. त्यामुळे स्थानिक मूळ समुदायांचे हक्क आणि ओळख धोक्यात येत होती.