आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन
(मिया मुसलमान म्हणजे बंगाली मुसलमान)

गौहत्ती (आसाम) – होय, आम्ही मिया मुसलमानांची (बंगाली मुसलमानांची) मते रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी आपल्या देशात नव्हे, तर बांगलादेशात मतदान करावे. ते आसाममध्ये मतदान करू शकणार नाहीत, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत. मतदार सूचींमध्ये चालू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकनाविषयी कुठल्याही आसामी नागरिकाला अडचण येत नाही; मात्र केवळ मिया मुसलमानालाच या प्रक्रियेचा त्रास होत आहे. मिया मुसलमानांना अडचणी येत असतील, तर आम्ही त्याची चिंता का करावी ?
If the Mising community would have inhabited the entire stretch of Assam from Dhubri to Sadiya, then we would not have been plagued with this scale of demographic invasion.#AmitShahInAssam pic.twitter.com/WjPMUw6IRZ
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 30, 2026
कोणताही मिया मुसलमान रिक्शावाला भाड्याचे ५ रुपये मागत असेल, तर त्याला ४ रुपयेच द्या. त्याला फार त्रास द्या, म्हणजे तो आसाम सोडून पुन्हा बांगलादेशात जाईल, असे विधान आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका कार्यक्रमात केले. यावरून त्यांच्यावर काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून टीका करण्यात आली.
🚨 "Harass Miya Muslims so they leave Assam" – Assam CM Himanta Biswa Sarma's remarks spark outrage
Key Points ⬇️
🗳️ Voting Rights Claim: CM Himanta Biswa Sarma said efforts are underway during voter-list reviews to ensure Miya Muslims vote in Bangladesh, not India.⚠️ He… pic.twitter.com/ppubxSRxBq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 30, 2026
(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सरमा यांनी क्षमा मागावी !’ – काँग्रेसची मागणी
काँग्रेसने ‘एक्स’वर सरमा यांचे हे विधान प्रसारित करत म्हटले की, हे नीच वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे लाडके नेते हिमंत बिस्व सरमा यांचे आहे. ते राज्यघटनेची शपथ घेऊन राज्यघटनेची पायमल्ली करत आहेत आणि देशात द्वेषाची बीजे पेरत आहेत. ही भाजप-रा.स्व. संघ यांची द्वेषपूर्ण मानसिकता आहे. हे विधान केवळ अशोभनीयच नाही, तर बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर आणि आपल्या गंगा-जमुनी संस्कृतीवर (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) थेट आक्रमण आहे, ज्याने प्रत्येक भारतियाला समानतेचा अधिकार दिला आहे. (घुसखोर मुसलमानांना हाकलून लावणे, हेच राज्यघटनेचे पालन करणे आहे. तसे न करणे राज्यघटनेचा अवमान आहे आणि काँग्रेस सातत्याने हा अवमान करत आली आहे अन् आताही करायला सांगत आहे. – संपादक) हिमंत बिस्व सरमा यांच्या या लज्जास्पद कृत्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी संपूर्ण देशाची क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी मुसलमानांचा अपमान करण्याचे सर्व विक्रम मोडले ! – मौलाना बरेलवी यांची टीका

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचा अभ्यासक) शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनीही मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्यावर टीका करतांना म्हटले की, सरमा यांची भूमिका मुसलमानविरोधी आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून ते सातत्याने मुसलमानांना लक्ष्य करत आहेत. सरमा मुसलमानांना घुसखोर आणि बांगलादेशी म्हणत आहेत. त्यांच्यावर अन्याय करत आहेत. निवडणुका जवळ येत असतांना त्यांनी मुसलमानांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ते मुसलमानांना ‘मिया’ म्हणून संबोधून त्यांचा अपमान करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे. मुसलमानांचा अपमान करण्याचे त्यांनी सर्व विक्रम मोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !