|
उज्जैन (मध्यप्रदेश) : उज्जैन जिल्ह्यातील तराना शहरात २२ जानेवारीच्या संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास धर्मांध मुसलमानांनी विश्व हिंदु परिषदेच्या प्रचाराकावर आक्रमण केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. यात ११ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. यात अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मुसलमानांच्या हातात धारदार शस्त्रे होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, तरी येथे मोठा तणाव होता. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र यानंतरही दुसर्या दिवशी, म्हणजे शुक्रवार २३ जानेवारीला दुपारच्या नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत पुन्हा हिंसाचार करत दगडफेक केली. तसेच अनेक बसगाड्यांची तोडफोड करून जाळपोळही केली. या घटनेनंतर स्थानिक हिंदु महिला काठ्या घेऊन संरक्षणासाठी बाहेर आल्या. गेल्या काही महिन्यांपासून येथे वाद चालू होता. त्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
🚨 Violence in Ujjain’s Tarana
VHP activists brutally attacked, buses vandalized & torched. Violence erupted after Namaz with ‘Allahu Akbar’ slogans.
🚔 Hindu groups protested; cases filed against 6.
What we saw in Kashmir, West Bengal & Kerala is now in Madhya Pradesh;… pic.twitter.com/Doks8FdQXh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2026
मुसलमानांनी २२ जानेवारीला विश्व हिंदु परिषदेचे प्रचारक सोहेल ठाकूर आणि त्यांचे सहकारी रजत ठाकूर यांना मारहाण केली होती. यात दोघेही गंभीर घायाळ झाले. दोघांनाही आधी तराना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहून त्यांना उज्जैन येथील रुग्णालयात नेण्यात आले.
हिंदु संघटनांचे पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
मारहाणीची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आणि परिसरात गस्त वाढवली.
६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी २२ जानेवारीला रात्री सांगितले होते की, मारहाणीच्या प्रकरणी ६ लोकांविरुद्ध प्राणघातक आक्रमणाचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या परिसरात शांतता आहे. उज्जैन, माकडौनसह इतर ठिकाणांहून तराना येथे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !