बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय !
सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.
सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.
भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो.
पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.
दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.
आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही.
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.
केवळ स्वतः इच्छा केल्याने कुणी काही मोठा होत नाही, तर सर्वकाही भगवंताच्या इच्छेने घडत असते. त्याला ज्याला वर आणायचे असते, तोच वर येतो आणि ज्याला खाली आणायचे असते, तो खाली येतो.
‘शिक्षणाचा संबंध माणसाच्या व्यावहारिक अर्थात् बाह्य जीवनाशी असतो, तर विद्येचा संबंध त्याच्या आंतरिक, म्हणजेच बौद्धिक, मानसिक संस्कारांशी आणि नैतिक जीवनाशी दिसतो. एक बहुतांशी मेंदूशी, तर दुसरे बहुतांशी अंतःकरणाशी जोडलेले असेच दिसते.
‘स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘प्रथम तुम्ही ईश्वराच्या राज्यात प्रवेश करा. बाकीचे आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. आपली संपूर्ण शक्ती लावा. संपूर्ण जीवन पणाला (पैजेला) लावून भगवद्राज्यात पोचलात, तर तुमच्यासाठी काहीही अप्राप्य (न मिळण्याजोगे) रहाणार नाही.’
उपनिषदांनी सांगितलेली ‘तरुण’ या शब्दाची व्याख्या पुष्कळ सुंदर आहे. तरुण हा साधू आणि नेहमी विद्यार्थी असावा. तरुण हा आशावादी, दृढ इच्छा असणारा आणि बलवान अशा ३ गुणांनी युक्त असतो.