५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वीज वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता अटकेत

विद्युत् जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महाराष्ट्र राज्य विद्युत् महावितरण आस्थापनेचे कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे आणि सरकारी ठेकेदार हारुण लाटकर यांना अटक केली आहे.

लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांची हातकणंगले पोलीस ठाण्यात मागणी

सहारानगर, रुई येथील लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भवड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा !

प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून धारातीर्थ यात्रेच्या दिनांकाची वाट पहात होता. अखेर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत धारातीर्थ यात्रा होत असल्याचे घोषित झाल्यामुळे धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत.

मडगाव येथील मोतीडोंगरावर राजकीय वरदहस्ताने अवैध बांधकामे होत आहेत ! – परशुराम गोमंतक सेना

एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

चिपी विमानतळाच्या नामकरणावरून वाद !

येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.

मुरगाव शहराला दिलेले वास्को-द-गामा नाव आणि विविध सार्वजनिक ठिकाणांना दिलेली पोर्तुगीज नावे पालटावी ! – भारतमाता की जय संघटना

गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ तो हाच !

‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले.

गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे