कोल्हापूर – येथील ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार यात्रा रहित करण्यात आली असली, तरी २९ डिसेंबरला परंपरेप्रमाणे ओढ्यावरील मंदिरात कंकण विमोचन सोहळा होणार आहे. सकाळी अभिषेक, अलंकार पूजा, आरती आणि रात्री ९ नंतर पालखी सोहळा होणार आहे. सध्या मंदिरात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करत दर्शन दिले जात आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !