सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तूर्तास नाहीच – महापालिका आयुक्त

देहलीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होतांना दिसत आहे. पाच मासांनंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या १ कोटी चाचण्या झाल्या

राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी ६ सहस्र ९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ सहस्र ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे का ?, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन करून १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रहित करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार ! 

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना १९ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘विजयनगर’ कर्नाटकातील ३१ वा जिल्हा; बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन

१८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती कायदामंत्री मधुस्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे विजयनगर या नवीन जिल्ह्याला कर्नाटकातील ३१ वा जिल्हा म्हणून मान्यता मिळणार आहे.

सिंधुदुर्गातील माध्यमिक शिक्षण विभाग ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्याच्या सिद्धतेत

राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून चालू करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने सिद्धता चालू केली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात येत आहेत.

डिचोली परिसरात नरकासुर प्रतिमांच्या सांगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा

खरेतर रस्त्यावर प्रतिमा जाळण्यावरच बंदी घालून ती कृती रोखायला हवी होती. प्रशासनात ते करण्याचे धाडस नाही, तर निदान दुसर्‍या दिवशी रस्ते तरी स्वच्छ करायचे होते ! नरकासुरवृत्ती जोपासणारे प्रशासन काय कामाचे ?

‘लेबर गेट’ घोटाळ्याचे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

‘इमारत आणि इतर बांधकाम मजूर कल्याण निधी’मध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी (‘लेबर गेट’ घोटाळा) भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे.