क्षमावान कोण असू शकतो ?
‘आपण ज्या पायरीवर उभे आहोत, तिथे दुसरेही आहेत अथवा येऊ शकतात’, हे कळले की, माणूस क्षमावान होतो. ही सहज आणि निरहंकारी क्षमा आहे. क्षमा करतो, असा भावही तिथे नाही.
‘आपण ज्या पायरीवर उभे आहोत, तिथे दुसरेही आहेत अथवा येऊ शकतात’, हे कळले की, माणूस क्षमावान होतो. ही सहज आणि निरहंकारी क्षमा आहे. क्षमा करतो, असा भावही तिथे नाही.
निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.
‘अध्यात्म-ज्ञान-प्राप्तीचे रहस्य ज्यात साठवले आहे, त्याला ‘चिंतन’ असे नाव आहे. शास्त्र भौतिक असो वा आध्यात्मिक असो, त्याचा खरा अभ्यास चिंतनातूनच होतो. त्यात अध्यात्मशास्त्र, तर चिंतनाशिवाय समजणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. चिंतन, म्हणजे एखाद्या विषयावरील मूलभूत विचार !
रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण, तर नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्थिर आणि दृढ असणारे सद़्गुरु शिष्यांनाही तसेच घडवत असणे
या भूमीवर सर्वांनी सुखी असावे. सर्वांनी रोग, आपत्ती रहित असावे. शुभदायक, कल्याणकारक आणि मंगल अशा घटना सर्वांना अनुभवता याव्यात. कुणाच्याही वाट्याला कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये.
जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे.
‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…
एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो.