संस्कृत भाषेचे सौंदर्य
विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.
विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.
ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे….
दुर्जनाशी मैत्री, तसेच प्रेम करू नये. कोळसा फुललेला असला, तर जाळतो, तसेच तो थंड असला, तरी निदान हात तरी काळा करतोच.
राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला.
‘भारत सर्वदूर कसा पसरला होता, हे जसे भूगोल आणि इतिहास यांवरून समजते; तसेच ते संस्कृती, भाषा, धर्म, रूढी अन् परंपरा यांवरून अधिक स्पष्ट होते. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’
दुसर्याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्हाडीचे पाते सुगंधित करते.
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.
सौंदर्याने नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या संस्कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्नपणाच होय !
उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.