सर्वश्रेष्ठ पदवी !
‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’
‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’
सध्या सनातन धर्म, संस्कृती, धर्मग्रंथ, कालगणना, संस्कृत, गोमाता, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. म्हणूनच हिंदूंनो, सनातन धर्मशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या युगादि तिथीला भारत हिंदु राष्ट्र स्थापित होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हा !
‘मुलांवर त्यांच्या लहानपणी सात्त्विकतेचे संस्कार केले, तर पुढे मुले गुन्हेगार होण्याची शक्यता अल्प होऊ शकते. याचा विचार करून ‘वयाने लहान असलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबियांनाही योग्य ती शिक्षा करण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे; कारण धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्मफलन्यायानुसार पालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.’
‘बुद्धीने समजण्यापलीकडे असलेले ईश्वराचे विश्वाचा व्यापार चालवण्याचे नियम, म्हणजे माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा साधना करून ईश्वराशी एकरूप होणे जास्त सोपे आहे !’
‘संस्कृत भाषेत भाषासौंदर्याने नटलेली आणि जीवनविषयक मार्गदर्शन करणारी सहस्रो सुभाषिते आहेत, तशी जगातील एका भाषेत तरी आहेत का ? अशा भाषेला काँग्रेस सरकारने मृतभाषा म्हणून उद्घोषित केले !’
‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’
‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’
‘पाश्चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन् सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’
‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असतेे. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’
या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले