विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !

विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !

‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग !

विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्म विसरल्याने भारतातील विविध भागांतील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

धर्म विसरल्याने भारतातील विविध भागांतील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोह !

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोह !

मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायित्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे ! हिंदु राष्ट्रात चांगल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !

विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !

‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. तात्पर्य विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली, तरच ते सत्य समजले पाहिजे, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻसर्वधर्मसमभाव’ हा शब्द अडाणीच बोलतात !

ʻसर्वधर्मसमभाव’ हा शब्द अडाणीच बोलतात !

‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले