कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली . सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?

स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?

‘कुठे भारतात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ ७५ वर्षेही राज्य करू न शकणारे भारतातीलच आतापर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे विदेशातून थोड्याशा सैन्यासह भारतात येऊन कोट्यवधी हिंदूंवर शेकडो वर्षे राज्य करणारे मुसलमान, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धरणे बांधणे यांसारखे केवळ वरवरचे उपाय करणारे शासनकर्ते नकोत !

धरणे बांधणे यांसारखे केवळ वरवरचे उपाय करणारे शासनकर्ते नकोत !

‘नुसती धरणे बांधून दुष्काळाला तोंड देता येईल का ? धरणे बांधली; पण पाऊसच आला नाही, तर धरणांचा काय उपयोग ? ‘अमुक इतके दुष्काळामुळे मेले’, अशा बातम्या छापत रहाणार का ? असे होऊ नये म्हणून जनतेला साधनेची गोडी लावावी. जनतेने साधना केल्यामुळे अवर्षण किंवा पूर कधीच येणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मातील ज्ञानाचे अद्वितीयत्व !

हिंदु धर्मातील ज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हल्लीच्या महिलांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

हल्लीच्या महिलांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची दैनावस्था होण्यामागील एक कारण !

हिंदूंची दैनावस्था होण्यामागील एक कारण !

‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?

‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले