‘लॉकडाऊन’ नको असेल, तर कोरोनाचे नियम पाळा ! – मुख्यमंत्री
‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.
‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.
देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा अग्रभागी ठेवली जाते. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानून संघाचे काम चालू आहे…..
सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतीकारक वासुदेव बळंवत फडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देण्यात येणारा पुरस्कार यंदा १७ फेब्रुवारी या दिवशी ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला प्रदान करण्यात आला.
बाणावली येथे १६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘धिर्यो’च्या (बैलांची झुंज) आयोजनावरून कोलवा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. पोलिसांनी ‘पिपल फॉर अॅनिमल्स’ (पी.एफ्.ए.) या प्राणीप्रेमी संघटनेच्या तक्रारीची नोंद घेऊन ही कारवाई केली.
माघ यात्रेसाठी शहरातील काही मठ आणि धर्मशाळा येथे यापूर्वीच आलेल्या भाविकांना मठाबाहेर काढू नये, वारकर्यांना मठ आणि धर्मशाळा येथून बाहेर काढण्यास पोलिसांनी बळजोरी केल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे.
‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !
करंजगावातील शेतकर्यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला, तर राजकीय विरोधातून ही ‘स्टंटबाजी’ केली जात आहे, असे साखर कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.
दर्शनाला येणार्या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला.
राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे.
गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल.