आदिवासी महिलेला धर्मांधांकडून मारहाण करून विनयभंग !

प्रतिकात्मक छायाचित्र

संगमनेर (अहिल्यानगर) – सारोळेपठार (संगमनेर) येथील आदिवासी महिलेचा २५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता पाणी भरण्यावरून शेजारी रहाणार्‍या जैतून अन्सारी हिच्याशी वाद झाला. या वेळी अन्सारी हिने महिलेला शिवीगाळ केली. रात्री अन्सारी, तिची मुलगी आणि जावई अतीक बशीर शेख यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. याविषयी आदिवासी महिलेने तक्रार नोंद करण्यासाठी वारंवार घारगाव पोलीस ठाण्यात चकरा मारल्या; पण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास नकार दिला. (अशा पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ! असे पोलीस असतील तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? – संपादक) अखेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यावर पोलिसांनी तिघांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला. पुढील अन्वेषण घारगाव पोलीस करत आहेत. (हिंदुत्वनिष्ठांनी गुन्हा नोंद झाला म्हणून न थांबता धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा घ्यायला हवा ! – संपादक)