इंडिगोच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
नवी देहली – जेव्हा इंडिगो एअरलाइनच्या विमानांची उड्डाणे रहित झाली, तेव्हा सरकारने काय केले ? विमानांच्या तिकिटांच्या किमती ४-५ सहस्र रुपयांवरून ३० सहस्र रुपयांपर्यंत कशा पोचल्या? इतर एअरलाइन्सनी याचा लाभ कसा घेतला ? तुम्ही काय कारवाई केली ? तुमच्यामुळेच परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली, अशा शब्दांत देहली उच्च न्यायालयाने इंडिगोच्या प्रकरणी केंद्र सरकारला फटकारले. इंडिगो संकटाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी आणि ज्या लोकांची विमान उड्डाणे रहित झाली किंवा जे विमानतळावर अडकले त्यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने फटकारले.
✈️ “₹4k to ₹30k Airfare Shock: Delhi HC Slams Govt!”
IndiGo Crisis: The Delhi High Court slams the Central Government, questioning its inaction as airfares skyrocketed from ₹4,000 to ₹30,000 during the chaos! 😡
The Court noted that this is not just about inconvenienced… https://t.co/PwcQtZWOJR pic.twitter.com/H04qCuWXJz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
पुन्हा असे होणार नाही, हे सरकारने सुनिश्चित करावे !
न्यायालयाने पुढे म्हटले की, हा केवळ वैयक्तिक प्रवाशांचा प्रश्न नाही, तर यामुळे आर्थिक हानीही झाली आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही.
संपादकीय भूमिकान्यायालयाने या प्रकरणी आता विमान वाहतूक आस्थापनांच्या तिकिटांच्या किमतीसाठी नियमावली लागू करण्याचा आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते ! |

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी