केंद्रीय मंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्रीय धातू आणि अवजड उद्योग मंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून शाळांच्या अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेता समावेश करण्याची विनंती केली आहे. ‘गीतेतील निवडक श्लोकांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नीतीमत्ता, वैचारिक सुस्पष्टता आणि चारित्र्य निर्माण होईल’, असे कुमारस्वामी यांनी या पत्रात म्हटले आहे.
I have written to the Hon’ble Union Minister of Education, Shri @dpradhanbjp avaru, requesting that the sacred scripture of our land, the Bhagavad Gita, be taught to students as part of their curriculum and that necessary steps be taken in this regard.
The timeless values of… pic.twitter.com/dgT6lAypUx
— ಹೆಚ್.ಡಿ.ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ | HD Kumaraswamy (@hd_kumaraswamy) December 5, 2025
कुमारस्वामी यांनी पुढे म्हटले की,
भारत प्राचीन काळापासून संत, ज्ञान आणि टिकून आलेली संस्कृतीमूल्ये यांची भूमी आहे. सनातन धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या सार्वत्रिक आदर्शनुसार चालतो. भगवान विष्णूचा आठवा अवतार असणार्या श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेचे शाश्वत ज्ञान जगाला दिले आहे, ज्यामध्ये निष्काम कर्म आणि कर्तव्याचे प्रामाणिक अन् समर्पितपणे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. या मूल्यांचा सध्याच्या जागतिक वातावरणात मोठा अर्थ आहे.
🚩 Gita in Schools? A Call for Value-Based Education
Union Minister @hd_kumaraswamy has written to Education Minister Dharmendra Pradhan, urging the inclusion of the Shrimad Bhagavad Gita in the school curriculum.
He says the Gita can strengthen morality, clarity of thought,… pic.twitter.com/0P7uPRKwu6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच श्रीकृष्ण मठात श्रीमद्भगवद्गीता पठणाच्या कार्यक्रमात भाग घेतला, ज्यामुळे सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचा प्रसार झाला आहे. या कार्यक्रमाने गीतेचे पठण आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली. स्थानिक नेते आणि पालक यांनीही शाळांमध्ये गीतेतील शिकवणीचा समावेश व्हावा, अशी मागणी केली आहे. मुलांना केवळ गाणीच नव्हे, तर रामायण आणि महाभारत यांचाही परिचय होणे तितकेच महत्त्वाचे आहे, असेही कुमारस्वामी यांनी शेवटी म्हटले.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !