Baba Bageshwar Padyatra : भारत हिंदु राष्ट्र झाले, तर बाँबस्फोट होणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पलवल (हरियाणा) – भारत जर हिंदु राष्ट्र झाले आणि सनातनी एकत्र आले, तर देहलीतील बाँबस्फोटासारख्या कृत्यांमध्ये कुणीही सहभागी होणार नाही, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. त्यांची ‘सनातन हिंदु एकता पदयात्रा’ येथे पोचली असतांना ते बोलत होते.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदूंच्या एकतेचा अर्थ ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) आणि ‘अहिंसा परमो धर्मः’ (अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे) हा आहे. हिंदु एकजूट झाला, तर ते(मुसलमान) कधीही कुणाचे प्राण घेण्याचा विचार करणार नाही.

मुसलमानच नेहमी आतंकवादी ठरतात !

एका प्रश्नाच्या उत्तरात पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले की, हेच जगाचे दुर्भाग्य आहे की, ‘हेच लोक’ (मुसलमान) नेहमी आतंकवादी ठरतात. कुठे तरी त्यांच्या शिक्षणपद्धतीत गंभीर त्रुटी आहेत. मदरशांच्या शिक्षणव्यवस्थेत मानवतेचे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे.